Wednesday, February 27, 2013

...!!!आमुची मायबोली !!!...


...!!!आमुची मायबोली !!!...
मराठी असे आमुची मायबोली जरी
आज ही राजभाषा नसे,
नसो आज ऐश्वर्य या माउलीला,
यशाची पुढे दिव्य आशा असे,
जरी पंचखण्डांतही मान्यता घे
र-वसत्ताबळे श्रीमती इड.ग्रजी,
मराठी भिकारीण झाली तरीही कुशीचा
तिच्या, तीस केवी त्यजी?

 जरी मान्यता आज हिन्दीस देई उदेलें
नवे राष्ट्र हें हिन्दवी,
मनाचे मराठे मराठीस ध्याती हिची
जाणुनी योग्यता, थोरवी,
असूं दूर पेशावरीं उत्तरीं वा असूदक्षिणिं
दूर तन्जावरीं,
मराठी असे आमुची मायबोली, अहो ज्ञानदेवीच देखा खरी.

मराठीअसे आमुची मायबोली जरी
भिन्नधर्मानुयायी असुं,
पुरी बाणली बन्धुता अन्तरड्.गी, हिच्या
एक ताटांत आम्ही बसूं; 
हिचे पुत्र आम्हा हिचे पाड्.ग फेडूं , वसे 
आमुच्या मात्र हन्मन्दिरी,
जग न्मान्यता हिस  अप्रू प्रतापे हिला 
बैसवू वैभवाच्या शिरी.

हिच्या लक्तरांची असे आज आम्हा,
नका फक्त पाहू हिच्या लक्तरं 
प्रभावी हिंचे रूप चापल्य देख पदवी 
फिकी ज्यापुढे अप्सरा;
न घालू जरी वाड्मया तील उंची हिरे 
मोतियांचे हिला दागिने,
मराठी असे आमुची मायबोली, वृथा हि 
बढाई सुकार्याविणे.
मराठी असे आमुची मायबोली, अहो,
पारतंत्र्यात हि खड्.गली,

हिची थोर संपती गेली उपे क्षेमुळे खोल 
 कालार्णवाच्या तळीं,
तरी सिन्धु  मन्थुनि  काढुनि रंत्ने नियोजूं
तयांना हिच्या  मण्डनीं-
नको रीण ! देवोत देतील तेव्हा जगांतील 
भाषा हिला खण्डणी.
                   
                          -माधव जुलियन 



Tuesday, February 26, 2013

....!!! मराठी राजभाषा दिन !!!...


..!!! मराठी राजभाषा दिन !!!...


आपल्याला अगदी परिचयाचे आणि जवळचे मराठी लोकप्रिय कवी , लेखक, समीक्षक व नाटककार विष्णु वामन शिरवाडकर म्हणजे  कुसुमाग्रज यांचा उद्या जन्म दिवस. ते मराठीतील एक आत्मनिष्ट व समाज निष्ठ जाणीव असणारे मराठीतले महत्वाचे लेखक मानले जातात. त्यांनी कुसुमाग्रज या टोपण नावाने आपले लेखन केले.ते सरस्वतीच्या मंदिरातील देदीप्यमान रत्न असे वर्णन करतात. वि.स. खांडेकर यांच्या नंतर यांच्यानंतर मराठी साहित्यातील ज्ञानपीठ पुरस्कार मिळवणारे दुसरे साहित्यिक होते. त्यांनी दिलेले योगदान पाहून त्यांचा जन्म दिवस हा 'मराठी भाषा दिन' म्हणून साजरा केला जातो.
आपण मराठी माणसांनी कधी विचार केला आहे का आपली मराठी भाषा का लुप्त होत चालली आहे जर हा भाषादिना दिवशी मी घेतलेला आढावा अठराव्या शतकात इंग्रज आले.इंग्रज आपल्या देशात व्यापार करण्याच्या उद्देशाने आले. आपला देश हिंदू भाषिक असल्याने त्या काळात आपल्या इथे मराठी भाषा आणि हिंदी  भाषा सरास बोलली जात होती.  इंग्रज त्या काळी आपल्या इथे व्यापार करण्याच्या उद्देशाने आले होते आणि त्याकाळी छत्रपती शिवाजीनी महाराजांच्या आज्ञा घेऊन इथे आपल्या व्यापाराची सुरुवात केली. तेव्हा इंग्रजांनी ईर-ट इंडिया कंपनीची र-थापना केली. आपल्या ईथे मराठी आणि हिंदी बोलली जात असे. येथील लोकांना इंग्रजी भाषा यावी आणि त्यांना इथे व्यापार करणे सुलभ व्हावे म्हणून त्यांनी इथे इंग्रजी शाळा काढल्या आणि येथील लोकांनी इंग्रजी शिकावी आणि त्याचा त्यांच्या स्वार्थ साठी त्यांनी इंग्रजी भाषेचा प्रसार करायला सुरुवात केली.  तेथ पासून इंग्रजी भाषा इथे रूढ झाली  ती आजतागायत. त्याकाळात आपल्या इथे मोठ मोठे संत होऊन गेले. उदाहरणार्थ: संत तुकाराम, ज्ञानेश्र्वर, सावतामाळी, बहिणाबाई आदि. ह्यांनी त्याकाळात आपल्या मातृभाषा (मराठी भाषेचा ) प्रसार केला.पण इंग्रज आले आणि त्यांनी मराठी भाषेला डावलून इंग्रजी भाषेचा प्रसार करायला सुरुवात केली. पण आपण पाहायला गेलो तर आताच्या एकविसाव्या शतकात आपली मराठी भाषा एवढी लुप्त होत चाली आहे कि विचारायला नको . अलीकडे मराठी शाळेच्या अनुदानावरून आणि मराठी महापालिका शाळा बंद करण्याच्या बंडच काही राजकीय पक्षाने माडला होता.त्यातच आपली मराठी माध्यमाची शाळा आणि भाषा ह्या राजकीय उद्देशा पायी भरडून निघाली. सी बी एस ई , आय सी एस ई आणि इंग्रजी माध्यमिक शाळामुळे आपली मराठी माध्यमिक शाळा आणि मराठी भाषा भरडून निघाली.  आपण ह्या सर्व कडे लक्ष देवून आपली मराठी भाषा लुप्त होणार नाही आणि आपली मराठी मायबोलीचा प्रसार करण्या साठी आपण सर्व मराठी माणसांनी योग्य ते पाऊल उचलले  पाहिजे. पण अलीकडच्या काळात पाहायला गेलो तर मराठी साठी अभिमान वाटावी असे चित्रपट निघाले. तसेच हल्लीच आपल्या मराठी भाषेला आणि मराठी माणसाला गर्व वाटावा असे घडले हल्लीच स्टार प्रवाह वरचे दोन कार्यक्रम १. होम मिनिस्टर २.डान्स महाराष्ट्र डान्स  ह्या दोन सिरियल ब्रिटन मध्ये हप्त्यातून दोन दिवस त्यांच्या टिव्ही चेनल वर दाखवण्यात येणार आहेत. हि तर खरच आपल्या मराठी माणसा साठी गर्वाची बाब आहे हे आपण विचार करून आपल्या मराठी भाषेचा प्रसार करावा. आजच्या काळात इंग्रजी आपण शिकू नाय असे मी बोलत नाही पण आपण आपल्या मराठी भाषेला हि विसरून चालणार नाही. आपल्या मराठी इतिहासात मोठ मोठ्या कवींनी महत्वाचे योगदान दिले आहे हे आपण विसरून चालणार नाही. वि.वा. शिरवाडकर (कुसुमाग्रज) यांच्या जन्म दिनी आज मराठी भाषा दिन साजरा करूया.




                                                "पाहुणे जरी असंख्य पोसते मराठी
                                                आपुल्या घरात हाल सोसते मराठी
                                                 हे असे कितीक खेळ पाहते मराठी
                                                 शेवढी मदांध तख्त फोडते मराठी"                              
                                  ....!!! मराठी भाषा दिनाच्या सर्वाना हार्दिक शुभेच्छा !!!....




-Ni3more

Monday, February 18, 2013

विंटेज अँड क्लासिक कार कलेक्शन


बिनाटपाची, मोठ्या चाकांची, तर कधी अगदीच विचित्र आकाराची...फक्त चित्रपटांत दिसणा-या या गाड्या रविवारी विंटेज अँड क्लासिक कार क्लब ऑफ इंडियाने आयोजित केलेल्या रॅलीच्या निमित्तानं मुंबईतल्या काळाघोडा येथे अवतरल्या होत्या. अगदी स्वतंत्रत्तोर काळापासून जतन केलेल्या गाडयाचे ते आता पर्यंतच्या गाडयाचे प्रदर्शन भरवण्यात आले होते. माझे ऑफिस येथेच असल्याने फोटो काढण्याचा छंद मला आवरता आला नाही.

      
    

                                                    वेगवेगळ्या अँगलने काढलेले फोटो.

                                                                                             -  Continue of the next Part 2

 - Ni3more

विंटेज अँड क्लासिक कार कलेक्शन (Part - II )



विंटेज अँड क्लासिक कार कलेक्शन



                                                      
                                                       वेगवेगळ्या अँगलने काढलेले फोटो.

                                                                                                   

- Ni3more

Thursday, February 14, 2013

व्हॅलेंटाइन डे


                                                                     व्हॅलेंटाइन डे

                                       

        व्हॅलेंटाइन डे म्हणजे मनातील भावना ऐकांमेकांन कडे प्रेम व्यव-त करण्यासाठी अलिखित मुहूर्तच असतो. यादिवसाची  प्रत्येक जण आतूरतेने वाट पाहतो. अगदी ज्याची गर्लफ्रेंड असो वा नसो. व्हॅलेंटाइन डे पश्चिमात्यनकडून आयात केलेला दिवस आहे. पण या दिवसाचे महत्त्व दिवसेंदिवस बदलत चालले आहे. आजची तरुण पिढी याचे अनुकरण करत आहे. कॉलेज च्या तरुण तरुणीन मध्ये तर याची खूपच क्रेझ पाहायला मिळते. याचा मुहुर्त  पाहून प्रत्येक जण आपल्या आवडत्या व्यक्तीला प्रपोज मारतो. भले होकार मिलो अथवा न मिळो, जर होकार मिळाला तर चांगलेच नाही मिळाला तर देवदास बनून फिरयला मोकळे. याच डे चा औचित्य साधून प्रत्येक तरुण तरुणी आज एकमेकाला प्रपोज करतो आणि आजचा दिवस कसा घालवायचा त्याचे प्लानिग करतो. याच दिवशी कित्येक जण याच दिवसाचा मुहूर्त साधून भटा कडून मुहूर्त काढून लग्न करण्याचा फयाड सर्वत्र रुजू झाला आहे. काही वर्ष पूर्वी या डे  ला शिवसेने   व्हॅलेंटाइन डे साजरा करण्यास मज्जाव केला होता, त्यादिवशी जो प्रेमयुगुल  दिसेल त्याचे लग्न तिथल्या तिथे करून देण्याचा चंगच बांधला होता. अश्याने प्रकारे शिवसेने कडे येणारे तरुणाची मते कमी झाली आणि कालांतराने त्यांचा व्हॅलेंटाइन डे ला असणारा विरोध हि माळवला. पण एवढा विरोध करून हि तरुण तरुणान मध्ये हा डे  साजरा करण्याचा क्रेझ अधिकच वाढीस लागला. याच दिवसाचे निमित्त साधून आजचे तरुण तरुणी  "मी तुझ्यावर प्रेम करतो" आय लव यु, विल यु मेरी मी'  असे म्हणतात.  पण या सर्वांचा आजच्या पिढीमध्ये विसर पडत चालला आहे. हल्लीच्या पिढीला व्हॅलेंटाइन डे कशाला साजरा करतात त्याचाच विसर पडणे हि लज्जास्पद बाब आहे.
.    'व्हॅलेंटाइन डे' हा प्रेमाचा दिवस म्हणून साजरा करण्याची पद्धत भारतीयांमध्ये अंगवळणी लागली आहे. तसेच पाहायला गेल्यास ज्या संत व्हॅलेंटाइनच्या नावावर हा दिवस आहे. त्याच्या एकूण अस्तित्वाबद्दल, व्याक्तीमात्वाबद्दल अनेक दंतकथा सांगितल्या जातात. गुढतेचे वलय असणार्या अशा एक नव्हे तर तीन व्हॅलेंटाइन नावाच्या संताना  कॅथलिक चर्चची मान्यता आहे. त्यापैकी रोमन सम्राट व-लाडियसने सैन्यातील शिपायांनी लग्न करू नये, असा फतवा काढला होता. अर्थात त्यामागे काही कारणे होती. सम्राटाच्या मते, ज्यांचे लग्न झालेले असते ते जीवावर उदार होऊन लढत नाहीत. परंतु संत व्हॅलेंटाइनने राजाच्या या धोरणा विरोधात जाऊन या सैनिकांची गुप्तपणे लग्ने लावून देण्याचा धडाका लावला होता. राजाला व्हॅलेंटाइनच्या त्या कृतीचा राग आला. त्यामुळे चिडून जाऊन त्याने व्हॅलेंटाइन ला देहदंड दिला. ज्या दिवशी व्हॅलेंटाइन ला मरण आले, तो दिवस 'व्हॅलेंटाइन डे' अर्थात प्रेमाचा दिवस म्हणून साजरा करण्याची पद्धत युरोपिया देशात रूढ झाली.पण, आजच्या युगात पाश्चिमात्यांचे अनुकरण करून प्रेम करण्याचे प्रमाण आजच्या तरुण तरुणीन मध्ये वाढीस लागलेले आहे. व्हॅलेंटाइन डे च्या दिवशी आपल्या आवडत्या व्यक्तीला गाठून प्रपोज करणे, कॉफी केफे डे, बरिस्त मध्ये एकमेकासमोर बसून अगदी डोळ्यात डोळे घालून आपल्या आजूबाजूच्या विश्वाचा विसर पडून आय लव यु, विल यु माय  व्हॅलेंटाइन , विल यु मेरी मी असे बोलून आपल्या प्रेमाचा हिजहार करणे.
              पण तात्पर्य एकच तारुण्याच्या ह्या धुंदीत आजच्या युवा पिढीने भुरळून न जाता नव्या नात्याला सुरुवात करताना एकमेकांना समजून घेणे काळजी घेणे. ह्या दिवशी संबंध जोडताना तुमच्या आजूबाजूला तुमचे आई वडील, सगे सोयरे - नातेवाईक कोणी नसते. लग्नाच्या ते बंधन नसतात त्या काळ्या मनी मंगळसूत्राचा गळया भोवती फास नसतो म्हणून योग्य तो विचार करून आपण " विल यु माय व्हॅलेंटाइन " बोलले पाहिजे.


Ni3 more

Tuesday, January 29, 2013

किल्ले वसई


                                                                     किल्ले वसई
                आपल्या वसईला म्हणजे शूर्पारक नगरीला पौराणिक काळापासून ते ब्रिटीश काळापासून असा मोठा ऐतिहासिक वारसा लाभला आहे.
उत्तरेकडे वैतरणा दक्षिणेला उल्हास नदी तसेच पूर्वेला तुंग पर्वत व पश्चिमेला विशाल समुद्र ह्यामुळे वसईला भौगोलिक दृष्टीने खूपच महत्व प्राप्त झाले होते.
अनेक तीर्थक्षेत्र , तलाव, बावखले ह्यांनी वसईची जमीन खूपच सुपीक होती. आशियातील सर्वोत्तम प्रतीची साखर आपल्या वसई मध्ये बनत असे.
शूर्पारक बंदरातून अखाती देशांशी इथे मिळणारे मसाले, साखर ह्या सारख्या अनेक उत्पादनांचा व्यापार चालत असे. बोट बांधणी साठी शूर्पारक फारच प्रसिद्ध होते.
किंबहुना म्हणूनच अनेक परकीय आक्रमण इथे झाली. ई.स. १५१५ च्या दरम्यान पोर्तुगीजांनी ह्या भूमीत पाऊल ठेवले त्यानंतर ई.स. १७३९ मध्ये नरवीर चिमाजी आप्पांनी तीन वर्षे झुंज देऊन पोर्तुगीजांना परास्त केले व वसई परकीय सत्तेपासून मुक्त केली. आधुनिक शस्त्रास्त्रांनी सज्ज असलेल्या पोर्तुगीजांवर पारंपारिक शास्त्रांच्या सहाय्याने मिळवलेला हा विजय महत्वाचा होता.
युरोपीय सत्तेविरोधातील भारतीयांचा हा पहिलाच विजय वसई मध्ये झाला ह्याचा वसई करांना सार्थ अभिमान वाटायला हवा. परंतु ह्या उज्ज्वल इतिहासाची साक्ष देणारा आपला वसईचा किल्ला, अनेक महत्वाचा ऐतिहासिक वास्तू मात्र उपेक्षित अवस्थेत आहेत.


                                                             ( चिमाजी अप्पा स्मारक )
तीन वर्षे राज्य वसवून मोर्चे बसवून सभोवती धमामी..
सुरुंगानी पाडिला अलगत बुरुज बदामी..
हल्ल्यात उडाले लोक, करिती किती शोक, पडून संग्रामी...
नऊ लक्ष बांगडी फुटली हो !! वसई मुव्कामी
सन १५५६ च्या दरम्यान वसई मध्ये पोतुगीज तोफांचा आवाज प्रथम कडाडला. त्यानंतर पोतुगीजांनी सन १५३४ मध्ये प्रथम बाले किल्ला व नंतर सध्या दिसत असलेल्या किल्ल्याच्या भव्य परिसरात एक सुसज्ज शहर वसवून तब्बल २०५ वर्षे वसईवर राज्य केले. पोतुगीजांच्या राजवटीत वसई मधील धार्मिक, राजकीय अन सामाजिक वातावरण ढवळून निघाले. पोतुगिजांकडून र-थानिकांवर अनेक जुलूम , धार्मिक छळ, अत्याचार झाले. अजूरकर नाईक आणि अंताजी कावळे ह्यां र-थानिक वतनदारांनी आपल्याला र-वराज्यात सामावून घेण्यासाठी पेशव्यांकडे साद घातली आणि त्याची परिणती म्हणून नरवीर चिमाजी अप्पांनी वसई मोहीम हाती घेतली. सन १७३७ ते १७३९ तीन वर्षे मराठी सैन्याने शौर्याची शिकस्त करुन वैशाख वद्य द्वितीयेस (१६ मे १७३९) वसई किल्लावर विजयीची पताका फडकावली. आधुनिक शस्त्रास्त्रांनी सज्ज  असलेल्या पोतुगीजांवर पारंपारिक शस्त्रांच्या सहाय्याने मिळवलेला हा विजय महत्वाचा आहे.
युरोप सत्तेविरोधातील भारतीयांचा हा पहिलाच विजय वसईमध्ये झाला हा सर्व भारतीयांसाठी अभिमानास्पद  आहे....

पुराणप्रसिद्ध श्री नागेश्र्वर मंदिर 
तेराव्या शतकात सदर मंदिराचा परिसर नागेश महातीर्थ या नावाने प्रचलित होता. इ.स. १७४० मध्ये नरवीर चिमाजी अप्पांच्या अकाली मृत्यु नंतर श्रीमंत नानासाहेब पेशवे यांनी या मंदिरेचा जीर्णोद्धार करण्यात आला. आजही अनेक धार्मिक कार्यक्रम ह्या मंदिरात होत असतात.
           

                                                
                                                          ( पुराणप्रसिद्ध श्री नागेश्र्वर मंदिर )                              


  • बालेकिल्ला 
१४ व्या शतकात आरंभी शेषवंशी क्षत्रिय घराण्यातील नाथाराव भंडारी भोगळे ह्याने नागेश्र्वर तीर्थजवळ गढी उभारली. १५३० मध्ये गुरजातच्या बहादुरशहाचा सुभेदार मलिक तुघान हयाने हया किल्लावर प्रथम वर्चर-व प्रर-थापित केले. त्यानंतर १५३५ च्या दरम्यान "नुनो दा कुन्हा" या पोतुगीज गव्हर्नरच्या हुकुमावरुन पहिला कप्तान "गार्सिया दिसा" हयांनी हा किल्ला बांधला.
                                     
                                                               ( बालेकिल्ला )



  • जिवनदायी ख्रिर-तमाता मंदिर

बालेकिल्याच्या उत्तर तटाला लागूनच हे चर्च आहे. पोतुगीज भाषेत हया चर्चचे नाव "नोसा-सिन्होरा-द-विदा" असे आहे. हया चर्चची उभारणी इ.स. १५३६ च्या दरम्यान करण्यात आली. पोतुगीज काळात गॅरीझन चर्च हया नावाने प्रसिद्ध होते. ब्रिटिशांनी १८५२ मध्ये हया वार-तुचा वापर साखर कारखान्यासाठी केला. प्रवेशव्दाराजवळ कॉरेन्थियन पद्धतीचे खांब आहेत. तसेच आत वेदीवरचे अर्धवर्तुळाकार छत हे हया वार-तुचे वैशिष्टय आहे.                                       
                                                                    

                                                   
                                        


  • टाऊन हॉल (कमारा) म्हणजेच नगरपालिकेची इमारत.
पोतुगीज कालीन शासकीय कामासाठी वापरात असलेली देखणी वार-तु. इ.स. १६०६ च्या दरम्यान ही वार-तु उभारली. बालेकिल्ल्याच्या आसपास पोतुगीज सरदारांनी मोठमोठे वाडे बांधल्यामुळे वसई किल्ल्यात आधुनिक नगरी निर्माण झाली. नगरपालिकेला लागुनच "मिझेरी कॉर्दिया" म्हणजेच रुग्णालय व कारागृह आहे.

                                       
                                     
                                                                          
                                                                     टाऊन हॉल




                                                  
                                                   


  • संत जोजेफ ख्रिर-त मंदिर

इ.स. १५४६ हे चर्च उभारले गेले. वसई किल्ल्यातील सर्वात उंच ख्रिस्ती मंदिर म्हणुन ही वार-तु प्रसिद्घ आहे. प्रवेशद्वाराच्या उजवीकडे एक मनोरा असुन त्यावर एक चक्री जिनाही आहे. मनोर-यावर चार रांजणाकृती कळस होते. मंदिरात सुरुवातीला दोन मनोरे होते त्यातील ऐक शिल्लक आहे. त्याला चक्रीमाडी जिना आहे. गोव्याचे बिशप यामध्ये वार-तव करत असे. इ.स. १५४६ ते १६०० साली हे चर्च उभारले गेले. यात चार कळस होते. आता तीन कळस शिल्लक आहेत. अगदी नगरपरिषदेच्या मागल्या बाजुस ऐक मोठी बाजारपेठेची जागा होती तिथे धान्यापासून ते दारुगोळा पर्यत सर्व वर-तू मिळत असे. हया किल्ल्याचे बांधकाम आर सी सी कस्ट्रकशन पद्धतीचे नसून प्रत्येक पायरी मोकळी आणि बाजुच्या भितींमध्ये अडवलेली आहे.तीन पर-यांचे चित्रे, केळीचा बुधां, फुलांचा रस यातून रंग संगती केली आहे. तब्बल १२०० वर्षे राहिलेली आहे. यात १५ भुरुज होते आता फव-त ऐक शिल्लक आहे.हनुमान मंदिराच्या समोर पडीक वार-तू आहे. तिथे बाजारपेठ होती. चिमाजी अप्पांनी हयातील बांधलेले पहिले मंदिर मिशीवाला मारुतिला कमरेला खंजिर आहे. चर्चच्या मागे वखार होती तेथे लागणारे साहित्य ठेवले जात असे. हयाच मंदिराच्या बाजुला लक्ष्मण भुरुज सागरी दरवाजा आहे.हा भुरुज ४-५ फुट उंच आहे. हया गंधक, शिरुर टाकून बांधकाम केले आहे. शत्रू जेव्हा किल्ल्यामध्ये प्रवेश करेल तेव्हा आपण गाफिल रहावे शत्रूची चूकामूक होण्यासाठी असे वेडेवाकडे दरवाजे बनवण्यात आले. वसई किल्लया मध्ये युद्ध झाले तेव्हा ऐकही हत्ती, उंट नव्हते फव-त घोडदळ होती. हत्तींनी वसई किल्ल्याचा  समुद्रीदरवाजा हि अफवा होती.


                                           
                                                        


  • गोन्सालो गार्सिया ख्रिस्त मंदिर
इ.स. १५४४ दरम्यान या चर्चच्या प्रवेशद्वराशी कॉरेन्थियन पद्धतीचे दगडी खांब आहेत तसेच वरच्या भागात सुर्य व चंद्र यांच्या प्रतिमा कोरल्या आहेत. कोरल्या आहेत. इ.स. १५५८ मध्ये या चर्चची पुर्नबांधणी करण्यात आली. यालाच लागुन महाविद्यालयाची वास्तु आहे.गोन्सालो गार्सिया भारतामध्ये आले होते. गव्याचे बिशप आणि व्हाईसरॉय याच्यां उपस्थितीत वेलबुट्टीचे नक्षी, शंकर पार्वती, भारतीय आणि रोम पद्धतीने १० फुट रुंद २२ फुट अर्धगोलाकार अश्या या महाविदयालयाचे बांधकाम १५६० मध्ये करण्यात आले.ख्रिस्ती धर्मांची दिक्षा देण्यासाठी या महाविदयालयाची स्थापना करण्यात आली.त्यावेळी परशुराम शास्त्री या पंडिताचे धर्मांतर करण्यात आले आणि हेगंरी डिसुजा हे नाव त्याले देण्यात आले.  
                                                                         
                                                     



  • हॉस्पिटल

इ.स. १६४९ मध्ये ६८ हजार रईस (त्यावेळचे चलन) खर्च वार्षिक मदत मिळायची ती मदत पोर्तुगीजांनी बंद केल्या मुले हे हॉस्पिटल दीड ते दोन वर्षात बंद झाले. इ.स. १६४९ मध्ये ६८ हजार रईस (त्यावेळचे चलन) खर्च वार्षिक मदत मिळायची ती मदत पोर्तुगीजांनी बंद केल्या मुले हे हॉस्पिटल दीड ते दोन वर्षात बंद झाले.

                                               
                                               

  • फ्रान्सिस्कन ख्रिस्त मंदिर 
इ.स. १५५७ मध्ये हया चर्चची बांधणी करण्यात आली. १५ मे १७३९ रोजी पोतुगीज कप्तान डिसोजा परेरा याने पोतुगीज अधिकाऱ्यांची येथे सभा घेऊन मराठ्यांना शरण येण्यामध्ये बारा कलमी तहाची ऐतिहासिक बैठक याच चर्चमध्ये झाली.
 

                                                 
                                              ( बारा कलमी तहाची ऐतिहासिक बैठक येथे झाली )


या किल्ल्याच्या संरक्षणासाठी तब्बल २४०० परदेशी नागरीक, १८०० गुलाम, २०० .युरोपीय नागरीक वापरण्यात आले.हा सर्वात जुना किल्ला आहे. हे सुसज्ज शहर म्हणून त्यावेळेला घोषित करण्यात आले. आणि त्याबाजुला लोक वार-तव्य करु लागली. येथे ऐक ताधांले तलाव आहे.आणि येथे शभंर च्या वरती गोडया पाण्याच्या विहीरी आहेत.येथे उत्खन्न करताना वेगवेगळी शस्त्रात्रे सापडली. येथील बांधकाम हे पूर्णता दगडाचे आहे. येथे सर्वात पहिले बांधलेले पोतुगीज चिन्ह आहे. त्याला राज चिन्ह असे म्हणतात.या किल्ल्यात शिरल्यावर पहिला दरवाजा आहे तिथे सर्वात पहिले राज चिन्ह बनवले आहे.
इ.स. १५१५ मध्ये पोर्तुगीज आले. आणि अरबी लोकांवर विजय संपादन करून त्यावेळी त्या त्या अधिकार्यांना वतन दिली हे सर्व मॅनेज करण्यासाठी नगरपालिका बांधली. व्हाईसरॉय यांनी त्याकाळी हे अत्याधुनिक सहकार म्हणून घोषित केले.  चर्चच्या आतमध्ये थडगे असणारे हे एकच चर्च आहे. हे फ्रान्सिसकन पंथातील चर्च आहे. इ.स १५३९ मध्ये चिमाजी अप्पांनी ह्या किल्ल्यावर आक्रमण करून बुरुज फोडला आणि सतत तीन वर्ष आक्रमण करून ह्या चर्च मधला कॅप्टन फ्रान्सीस डिसिल्वा अक्षरश: मराठ्यांची आक्रमांची शिकस्त पाहून हैराण झाला आणि शेवटी चिमाजी अप्पाना शरण आला आणि १२ पानाचा तह झाला तो याच चर्च मध्ये झाला आणि युद्धाला विराम दिला.

                                 

                                                           नगरपरिषद



 
                                                   
                                                           शिलालेख


                                                            ( लक्ष्मण भुरुज दरवाजा )





                              आम्ही किल्ल्याला व्हिजीट दिली तेव्हा उत्खननाचे काम चालू होते



नितिन मोरे